Maharashtra News updates: राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (7 मार्च 2023) सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
हे पण वाचा : जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे, यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 7, 2023
ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
हे पण वाचा : Rang Panchami: रंगांची एलर्जी असल्यास काय करावे?
मुंबई, ठाण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात येत्या 24 तासात उ.मध्य महाराष्ट्र, मरा़ठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका/मध्यम पावसाची शक्यता आहे. सोबत ढगाळ आकाश, जोरदार वारे ही. ही स्थिती 7 मार्च ते 9 मार्च अपेक्षित. उद्या पासून (8 मार्च 2023) सुधाऱणा होण्याची शक्यता आहे.
7 Mar:राज्यात येत्या 24 तासात उ.मध्य महाराष्ट्र, मरा़ठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका/मध्यम पावसाची शक्यता. — K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 7, 2023
सोबत ढगाळ आकाश, जोरदार वारे ही. ही स्थिती 7-9 Mar अपेक्षित. उद्या पासून सुधाऱणा होण्याची शक्यता.
7 Mar, राज्याच्या आतल्या भागात गारपिटीची शक्यताही.
-IMD pic.twitter.com/iPgNqCppuk
हे पण वाचा : स्वप्नात फळे दिसणे शुभ की अशुभ?
रविवारी रात्रीपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात पावसासोबतच गारपीट सुद्धा झाली. या अवकाळी पावसामुळे कांदा, हरभरा, गहू तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्याच्या सुरुवातीला रब्बी हंगामातील पिके काढण्यात येतात मात्र, त्याचवेळी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.