मुंबईकरांनो ऐकलं का! 15 दिवसांसाठी शहरात लागू होणार संचारबंदी, पण का? जाणून घ्या

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 02, 2022 | 13:32 IST

आदेशानुसार, वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची शंका पोलीस उप आयुक्त ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. संचारबंदी करण्यात आलेल्या काळात कोणत्याही प्रकारची दंगल आणि हानी होऊ, नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली झाली आहे.

Curfew in Mumbai city for fifteen days, but why?
पंधरा दिवसांसाठी मुंबई शहरात संचारबंदी, पण का?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शहरातील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे.
  • वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची शंका पोलीस उप आयुक्त ठाकूर यांनी व्यक्त केली आहे
  • संचारबंदीत कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही. 

मुंबई :  मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी असून नागरिकांना उद्यापासून एकत्र जमता येणार नाहीये.मुंबई (Mumbai) शहरात उद्यापासून थेट 15 दिवसांसाठी संचारबंदी (Curfew) लागू केली जाणार आहे. बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त (Deputy Commissioner of Police) (अभियान)   विशाल ठाकूर (Vishal Thakur) यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. या संचारबंदीचे उल्लंघन केल्यास नागरिकांकडून दंड, तसेच त्यांना शिक्षा केली जाणार आहे.  (Mumbaikars have heard! Curfew to be imposed in the city for 15 days, but know why)

अधिक वाचा  : सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी गँगस्टर गोल्डी ब्रारला पकडले

पोलीस उप आयुक्त ठाकूर यांच्या आदेशानुसार, शहरातील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे. या कारणानिमित्त 03 डिसेंबरपासून ते थेट 17 डिसेंबरपर्यंत या पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पोलिसांना विविध स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार, शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने पोलीस उप आयुक्त ठाकूर यांनी त्यांना असलेल्या अधिकारानुसार शहरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिलेत.

आदेशानुसार, वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची शंका पोलीस उप आयुक्त ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. संचारबंदी करण्यात आलेल्या काळात कोणत्याही प्रकारची दंगल आणि हानी होऊ, नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली झाली आहे. यामुळे या दरम्यानच्या पाच किंवा अधिक व्यक्तीच्या हालचाली तसेच बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. 

अधिक वाचा  : केंद्रीय आरोग्यमंत्री धडकल्या उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात

या गोष्टींवर असतील प्रतिबंध 

१) पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध असेल. 

२) कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही. 

३) कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर,  वाद्य, बँण्ड आणि फटाके फोडण्यास मनाई असेल. 

आदेशात समाविष्ट असलेल्या मनाईसाठी खालील प्रमाणे सूट देण्यात आली आहे. 

  •  सर्व प्रकारचे विवाह समारंभ इत्यादींना परवानगी असेल. 
  • अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी / दफन स्थळांच्या मार्गावर मिरवणूक काढण्यास परवानगी असेल.
  •  कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांची कायदेशीर बैठका घेता येतील. 
  • सामाजिक मेळावे, आणि क्लब, सहकारी संस्था, इतर सोसायट्यांमधील आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठीच्या बैठकीस परवानगी असेल.
  • चित्रपटगृहे नाटकगृहे किंवा सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही ठिकाणी होणारी गर्दीस परवानगी असेल. 
  • नाटकाचा कार्यक्रम पाहण्याच्या उद्देशाने जमाव होण्यास परवानगी 
  •  सरकारी किंवा निमशासकीय कार्ये पार पाडण्यासाठी होणाऱ्या जमावास परवानगी असेल. 
  • न्यायालये आणि कार्यालयामध्ये किंवा त्याभोवती लोकांच्या एकत्र येण्यास   परवानगी. 
  • शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थामध्ये किंवा त्यांच्या आसपास होणाऱ्या संमेलनास परवानगी. 
  • कारखाने, दुकाने, आणि आस्थापनांमध्ये सामान्य व्यापार, व्यवसाय आणि आवाहनासाठी एकत्र येण्यास परवानगी. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी