Mumbai Pollution : मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांत प्रदूषण वाढले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाची खराब झाली आहे. मंगळवारी मुंबईत हवेची गुणवता ३०९ इतकी नोंदवली गेली. बुधवारी हवेची गुणवत्ता आणखी खालवली आणि ती ३८५ पर्यंत नोंदवली गेली. मुंबईत दिल्लीपेक्षा १५ टक्क्यांनी अधिक प्रदूषणाची नोंद झाली.
मुंबईत सध्या आग्नेय दिशेने वारे वाहत आहेत, त्यामुळे हे प्रदूषण कमी होण्याची चिन्हे कमी आहेत. मुंबईत धीम्या गतीने वारे वाहत आहेत. त्यामुळे प्रदूषण वाढल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या प्रदूषणापासून वाचण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
अधिक वाचा : उदयनराजे आक्रमक; शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या 'त्या' वक्तव्याविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.