Weather update : अचानक बदलले वातावरण, कुठे थंडी वाढली तर कुठे पावसाचा अंदाज

Weather update : महाराष्ट्रातील अनेक भागात हवामानात पुन्हा एकदा अचानक बदल झाला आहे. थंडी वाढली आहे. विदर्भातील अनेक भागात पाऊस झाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत मुंबई-पुण्यासह अनेक भागात थंडी वाढणार आहे.

Rain warning with thunder in Madhya Maharashtra, Marathwada
अचानक बदलले वातावरण, कुठे थंडी वाढली तर कुठे पावसाचा अंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तामिळनाडूमध्ये 900 मीटर उंचीवर जोरदार चक्रीवादळ
  • 29 ते 31 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात कुठेतरी थंडी वाढेल, कुठे पाऊस पडेल.
  • मुंबई-पुण्यासह कोकणात थंडीचा कडाका वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरणात अचानक बदल झाला आहे. अनेक भागात थंडीने पुन्हा जोर धरला आहे. 29 जानेवारीपासून त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे पश्चिम विदर्भातील अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. विशेषत: अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. (Rain warning with thunder in Madhya Maharashtra, Marathwada)

अधिक वाचा : Adani Group च्या शेअर्सच्या घसरणीमुळे LIC चे 18300 कोटी बुडाले, जाणून घ्या काय आहे प्रकरण
हवामान तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानजवळ वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. त्यामुळे राजस्थानवर १.५ किमी उंचीवरून जोरदार वारे वाहत आहेत. यासोबतच उत्तर-पूर्व अरबी समुद्रात नैऋत्य उत्तर प्रदेशपर्यंत कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे.

अधिक वाचा : IND vs NZ 1st T-20: न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा 21 रन्सने पराभव 

तामिळनाडूमध्ये 900 मीटर उंचीवर जोरदार चक्रीवादळ वारे वाहत आहेत. त्यामुळे 29 ते 31 जानेवारी दरम्यान मध्य भारतातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांत सामान्य पाऊस पडू शकतो.

अधिक वाचा : धुळे आणि नाशिक लोकसभेचं गणित बदलणार, भाजप नेते अद्वय हिरेंचा ठाकरे गटात प्रवेश

मुंबई-पुण्यासह कोकणात थंडीचा कडाका वाढणार, २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत कडाक्याची थंडी राहणार आहे
मुंबईसह कोकण भागाबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्रातील इतर भागाच्या तुलनेत येथे तापमानात घट झाली असून थंडी वाढली आहे. ही थंडी आणखी वाढणार आहे. हवामान खात्यानुसार, 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची नवी लाट येत असून, ती 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे.

अधिक वाचा : Daily Horoscope 28 January: जानेवारी महिन्यातील शेवटचा शनिवार तुमच्यासाठी कसा? वाचा 12 राशींचे भविष्य

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. त्याच्या प्रभावामुळे पुणे आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची नवी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषत: 30 जानेवारीपासून तापमानात झपाट्याने घट होईल. हवामान तज्ज्ञांच्या मते, गुजरातमधून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम पालघर, उत्तर मुंबई आणि ठाण्यात होत आहे. त्यामुळे येथे हळूहळू तापमानात घट होत आहे. त्यात आणखी घसरण होऊन थंडी आणखी वाढेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी