मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज (२२ ऑगस्ट) कोहिनूर मिल प्रकरणी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची तब्बल साडे आठ तास चर्चा केली आहे.
राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचण्यापूर्वी मुंबईत जोरदार घडमोडी सुरु घडत होत्या. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली होती. काही वेळापूर्वीच मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यापासून मनसे कार्यकर्ते फारच आक्रमक झाल्याचं दिसून आहे. त्यातच आता मनसे कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला धक्का लावू नये यासाठी त्यांना ताब्यात घेत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे यांना आज फोर्ट परिसरातील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यामुळे या परिसरात मनसैनिक मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता लक्षात घेऊन येथे बराच फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, कालच मुंबई पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकऱ्यांना कलम १४९ नुसार नोटीस बजावली होती. राज ठाकरे यांच्या चौकशीदरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत पोलिसांनी यावेळी दिले होते.
UPDATE:
राज ठाकरेंनी सुद्धा केलंय आवाहन
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी ठाणे बंदचं आवाहन केलं होतं. मात्र, नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असं सांगत राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना ठाणे बंद मागे घेण्यास सांगितले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयावर धडकणार असल्याचं मनसेने नियोजन केलं होतं. मात्र, राज ठाकरे यांनी कुठल्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने ईडीच्या कार्यालयाबाहेर न येण्याची ताकीद दिली. तसेच सर्वांना २२ ऑगस्ट रोजी शांतता राखण्याचं आवाहनही यांनी केलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.