मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसे प्रमुख (MNS Chief) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदींवरील (Mosque) भोंग्याविरुद्ध हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याच्या घोषणेवर सडकून टीका केली. राज ठाकरे हे दंगली भडविण्याचे काम करीत आहे. समान नागरिक कायदा अपेक्षित होता. हा कायदा नेमका कशासाठी करतात, हे तरी त्यांनी वाचून घ्यावे. प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करता. यातून हाती काहीच लागणार नाही. तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या, चेहऱ्यावर सात्विक भाव येऊ द्या. हनुमान चालीसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येत नाही, असा खोचक टोला आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना आज मारला.
. तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा मुखोद्गत (पाठ) नाही. तुम्हालाही दोन ओळी म्हणता आल्या नाहीत,”असं म्हणत अमोल मिटकरी यांनी थेट राज ठाकरेंवर हल्ला चढवला. मिटकरी यांनी व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आम्ही हनुमान चालिसा लहानपणापासून पाळण्यात शिकलेली हिंदू माणसं आहोत. तुलसीदासांनी इतकं सुंदर हनुमान चालिसा लिहिली आहे. रामचरितमानसवर उर्दु शब्दांचाही प्रभाव आहे. हे तुम्ही कबुल करा. मुस्लिमांचा विरोध करू नका.” “मुस्लिमांनी रामावर सर्वात सुंदर भजन म्हटलं आहे. त्यांचं नाव आहे मोहम्मद रफी, चित्रपट गोपी, भजन आहे ‘सुख के सब साथी, दुःख में न कोई, मेरे राम, तेरो नाम एक साचा दुजा न होए’. दिलीप कुमार बाळासाहेब ठाकरे यांचे जीवश्य मित्र होते. ते जातीने मुस्लीम होते, त्यांनी गोपीची भूमिका केली. डॉ. जलील परकार हेही बाळासाहेबांचे निकटवर्तीय होते. तुम्ही महाराष्ट्रात किती मुस्लीम द्वेष पेरणार आहात. महाराष्ट्रात जातीय दंगे भडकणार नाहीत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे,” असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.
दोन वर्षांपासून राज्यावर आर्थिक संकट आहे. आता कुठे राज्य आर्थिक संकटातून बाहेर पडत आहे. सर्वसामान्य हिंदू असेल, सर्वसामान्य मुस्लिम असले त्यांचे मजुरीचे आणि उदरनिर्वाहचे प्रश्न आहेत. भोंगे वाटणे, हातात तलवारी घेणे, तलवारी वाटणे हे आमचे प्रश्न नाही आहे. राज्याला फुले, शाहू आंबेडकर यांची परंपरा आहे. देशाला बाबासाहेब यांनी संविधान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचून जर काही लोकांना वाटत असेल तर काही लोकांना वाटत असेल तर मस्जिद वरील भोंगे उतरवा तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परत एकदा वाचावा, रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळावर भोंगे वाजता कामा नाही, असा निकाल आहे.
त्यांनी तलवारी काढल्या तर आम्ही तलवारी काढू. काल महाराष्ट्राने तुमचे मनसुबे उधळले आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिमांनी हनुमान चालीसा वाचली. कायद्याचे राज्य आहे. कायद्याने राज्य चालते. हिंदू, मुस्लीम यांना शिक्षणाचे, बेरोजगारीचे दरवाढीचा प्रश्न महत्वाचे आहे. दंगली भडकल्या तर गृह विभागाने लक्ष दिले पाहिजे की चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वर कारवाई केली पाहिजे, असेही आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.