मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक प्रचार दरम्यान केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात पडसाद पडत आहे. मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले म्हणाले होते. पण मी गावगुंड मोदीबद्दल बोललो होतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल हे विधान केले नव्हते असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.
पण, असे असताना राज्यभरातून भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यातील विविध शहरात आंदोलन केले आहे.