Mumbai Maharashtra Monsoon Weather update : मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.