Ramdas Athavale : उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीसांना मुख्यमंत्री करावे - आठवलेंचा सल्ला 

Political News in Marathi । राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही आहे. त्यामुळे शिवसेनेतून कोणालातरी मुख्यमंत्री करण्याचे ठरवले जात आहे. परंतु, माझा असला सल्ला आहे की उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे

Fadnavis should be made CM instead of Uddhav Thackeray - Athavale's advice
उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीसांना मुख्यमंत्री करावे - आठवले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही आहे.
  • शिवसेनेतून कोणालातरी मुख्यमंत्री करण्याचे ठरवले जात आहे.
  • परंतु, माझा असला सल्ला आहे की उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे

नाशिक :   राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही आहे. त्यामुळे शिवसेनेतून कोणालातरी मुख्यमंत्री करण्याचे ठरवले जात आहे. परंतु, माझा असला सल्ला आहे की उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र यावे असा सल्ला केंद्रीय सामाजिक कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील भाजप शिवसेनेला दिला आहे. 

नाशिकमध्ये  झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. त्यांनी विविध विषयांवर खास आपल्या शैलीत फटकेबाजी केली. 

आठवले यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे : 

  1. कोरोना मुळे देशात ५ लाख मृत्यू गर्दी टाळायला हवी
  2. कोरोनाचा सामना करण्याची जबाबदारी जशी सरकारची तशी आपली
  3. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे,केंद्रीय मंत्री पर्यंत करत आहे
  4. देशापैकी २५ टक्के केसेस महाराष्ट्रात आहे त्यामुळे  काळजी करावी
  5. उद्धव ठाकरे यांनी लवकर बर होऊन कोरोना विरोधात दंड थोपटावे अशी अपेक्षा आहे 
  6. उद्धवजी आणि आमचे घरोब्याचे संबध आहे 
  7. भीम शक्ती शिव सक्ती एकत्र आलो होतो
  8. दलित पँथर ला ५० वर्षे पूर्ण झाले त्याला पुनर्जीवित करण्याची गरज आहे
  9. येणाऱ्या ५ राज्याच्या निवडणुकीत आम्ही भाजप सोबत राहणार मात्र युती झाली नाही तर आम्ही आमच लढू 
  10. पंजाब मध्ये काँग्रेस ने विश्वस गमावलेला आहे
  11. बाबासाहेबांच संविधान बद्दलण्यासाठी आणि दलितांच आरक्षण रद्द करन्यासाठी मोदी सरकार सत्तेवर आले आहे असा अपप्रचार केला जातोय
  12. उद्धव यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवाव आणि एकत्र यावं अस आमचं उद्धव ठाकरे यांना आवहान आहे 
  13. उत्तर प्रदेश,RPI ला 8 10 जागा द्याव्या नाही दिल्या तर
  14. राज्यपालांची तब्येत बिघडल्याने भेट पुढे ढकलली राज्याच्या राजकारणा बाबत पुढील भेटीत चर्चा करेल
  15. निवडणूक आयोगाच मत आणि गाईडलाईन दिल्या आहे ते स्वतंत्र मत आहे त्या मुळे राऊत बोलताय त्याला 
  16. इलेक्शन पुढे ढकलायला हवे होते पण इलेक्शन कमिशन ने जे नियम दिले त्यानुसार होतील
  17. काँग्रेस पक्षाला अध्यक्ष मिळत नाही सोनिया गांधी टेम्पररि अध्यक्ष आहेत
  18.  कोणत्याही राज्यात काँग्रेस स्ट्रॉंग नाही त्या मुळे निवडणुकीत मागे पळताय मात्र निवडणुका लढायला हव्या
  19. दोघांना माझी विनंती कुणाचे घर जाळू नये चायना पाकिस्थान सोबत लढायला एकत्र या
  20. गोव्यात निवडणुका न लढता महामंडळ देण्याचं कबूल केलं आहे भाजपचे मत खान्यापेक्षा मी त्याच्या सोबत जाणार प्रचार देखील करणार
  21. परिकर यांच्या मुलाला सेनेने ऑफर दिली असली तरी ते सनेकडे जाणार नाही
  22. भाजपला विश्वास होता काँग्रेस पाठींबा देणार नाही आणि त्यांचा तो अंदाज चुकला
  23. भाजपने शिवसेनेला ५ वर्ष मुख्यमंत्री पद द्यावं या मुद्द्यावर एकत्र येऊ शकता भाजपने याचा विचार करावा
  24. काँग्रेस ला कोणी सोबत घेणार अस त्यांना समजलं म्हणून ते स्वबळावर लढताय
  25. ST कर्मचारी मी मंत्री असतांना वेळेवर पगार देत होतो या सरकारच्या काळात पगार मिळत नाही म्हणून विलीनीकरण निर्णय पुढे आलाय
  26. समाजकल्याण खात्यात भ्रष्टाचार होणं अयोग्य आहे गरिबांच ते खात आले 
  27. नरेंद्र मोदी गुजरात मुख्यमंत्री असताना देशात फिरले 450 सभा त्यांनी घेतल्या त्यांना तेंव्हा अडवलं नाही त्यांची सुरक्षा करणं त्या राज्याची जबाबदारी आहे
  28. काही लोकांनी जाणीव पूर्वक हे केलं त्यांचा घात पात करण्याचा डाव होता म्हणून ते अस म्हणाले सुखरूप वापस आया
  29. पोलिसांची जबाबदारी होती मात्र त्यांना जाणिपूर्वक रोखलं
  30. रस्ता भाजपच्या लोकांनी नव्हे तर काँग्रेसच्या लोकांनीच अडवला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी