The gym trainer became a thief पुणे : देशासह राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा घालून देण्यात आला होता. मात्र, या लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या त्यमुळे अनेकांच्या नौकऱ्या गेल्या. तर काहींचे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. एवढचं नव्हे तर अनेकांनी निराश होऊन आत्महत्या देखील केल्या असल्याचं समोर आलं आहे. तर काहीजण गुन्हेगारीकडे काहीजण गुन्हेगारीकडे वळले आहेत. दरम्यान, पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. लॉकडाऊन काळात नोकरी गेल्यानंतर एका जिम ट्रेनरने पत्नीच्या मदतीने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण लोकांचे शरीर कसे धष्टपुष्ट बनवायचे याचे धडे देणाऱ्यावर थेट चोरी करायची वेळ या लॉकडाऊनमुळे आली. बाळासाहेब प्रदीप कुमार हांडे असं या जीम ट्रेनरचे नाव असुन त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, ३० नोव्हेंबरला एका सराफाच्या दुकानातून मंगळसूत्र चोरी केल्याचा गुन्हा पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात दाखल झाला. सोने चोरीचा गुन्हा असल्याने पोलिसांनी तात्काळ याचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी एका दुचाकीवर जाताना दिसला. आणि पोलिसांनी थेट दुकाचीकीच्या आधारे आरोपीला अटक केली. असता सदर धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ३० नोव्हेंबर रोजी आरोपी बाळासाहेब हांडे हा पत्नीला घेऊन परमार ज्वेलर्स मध्ये आला होता. त्याची पत्नी आणि तो दुकानांमध्ये चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याआधारावर पोलिसांनी कारवाई केली. बाळासाहेब हांडे आणि त्यांनी पत्नी दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने एक लाख बावीस हजार रुपयाचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.
चोरी करण्यासाठी त्याने पत्नीलाही सोबत नेले होते. त्यानंतर सेल्समनचे लक्ष दुसरीकडे विचलित करून त्याने मंगळसूत्राची चोरी केली आहे. बाळासाहेब हांडे हा एका जिममध्ये ट्रेनिंग देण्याचे काम करत होता. कोरोना महामारीनंतर राज्यात लॉकडाऊन लागले आणि जिम बंद पडली. त्यानंतर उत्पन्नाचे कुठलेही साधन नसल्याने त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
कोरोना काळात अनेकांच्या नौकऱ्या गेल्या अनेकांचे व्यवसाय बंद पडले मात्र, त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रयत्न करून पुन्हा ते व्यवसाय उभा केले. मात्र, बाळासाहेब हांडे सारख्यांनी काही चुकीचे मार्ग अवलंबले आणि गजाआड गेले आणि त्यांचे कुटुंबीयही आता अडचणीत आलेत, कारण त्यांना कोर्टाचे खेटे करावे लागतात.