भंगार विक्रेत्याचे अपहरण; कुटुंबीयांकडे केली इतक्या रकमेची मागणी, कारण ऐकून बसेल धक्का

ठाणे
भरत जाधव
Updated Aug 16, 2022 | 19:20 IST

डोंबिवलीत (Dombivli) पुन्हा एकदा अपहरणाची घटना घडली आहे. एका भंगारवाल्याचं अपहरण (Kidnapping) झालं असून त्यांच्याच मित्रांनी त्यांच हे कृत्य केल्याचं पोलिसांच्या (police) तपासत उघड झालं आहे. वाढदिवसाच्या मेजवानीचा खर्च मिळवण्यासाठी मित्रांनी भंगार विक्रेत्या मित्राचं अपहरण केलं होतं. दरम्यान आरोपी (Accused) अद्याप फरार असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. रामनगर पोलीस ठाण्यात भंगार विक्रेता मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Kidnapping of a scrap dealer
भंगारवाल्याच्या फॅमिलीकडे इतक्या रुपयांच्या खंडणीची मागणी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
  • गेल्या आठवड्यात एका फर्निचर विक्रेत्याचे ५० लाखाच्या खंडणीसाठी चार जणांनी अपहरण केले होते.
  • वाढदिवसाच्या मेजवानीचा खर्च मिळवण्यासाठी मित्रांनी भंगार विक्रेत्या मित्राचं अपहरण केलं.

डोंबिवली : डोंबिवलीत (Dombivli) पुन्हा एकदा अपहरणाची घटना घडली आहे. एका भंगारवाल्याचं अपहरण (Kidnapping) झालं असून त्यांच्याच मित्रांनी त्यांच हे कृत्य केल्याचं पोलिसांच्या (police) तपासत उघड झालं आहे. वाढदिवसाच्या मेजवानीचा खर्च मिळवण्यासाठी मित्रांनी भंगार विक्रेत्या मित्राचं अपहरण केलं होतं. दरम्यान आरोपी (Accused) अद्याप फरार असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. रामनगर पोलीस ठाण्यात भंगार विक्रेता मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला आहे.दरम्यान अशा घटनांमुळे व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मौजमजा, झटपट श्रीमंत होण्यासाठी डोंबिवलीतील बेरोजगार तरुण एकत्र येऊन व्यावसायिकांचे अपहरण करत असल्याचे चित्र आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात डोंबिवलीतील एका फर्निचर विक्रेत्याचे ५० लाखाच्या खंडणीसाठी चार जणांनी अपहरण केले होते.

आकाशच्या अपहरणाप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणाचा हा प्रकार डोंबिवली पूर्वेतील आयरे परिसरात घडला आहे. वाढदिवसाची मेजवानी जल्लोषात साजरी करण्यासाठी तीन मित्रांनी एका भंगार विक्रेत्या मित्राचे अपहरण केले. या तिघांनी भंगार विक्रेत्या मित्राला खोटे सांगून त्याला घरातून बाहेर बोलवले आणि तीन जणांनी एका रिक्षामध्ये जबरदस्तीने बसवून त्याला नवी मुंबईतील खारघर येथे नेले. तेथे त्याच्या जवळील मोबाईल, रोख पाच हजार रुपये काढून घेऊन त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

Read Also : खासगी नोकरी करणाऱ्यांसच्या पगारात होणार इतकी मोठी वाढ

अपहृताच्या कुटुंबीयांकडे मुलाला जिवंत पाहिजे असेल तर २० हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. तर, पैसे दिले नाहीत तर आरोपींनी आकाशला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार आकाशच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे सुरू केली. आरोपींनी आकाशला डोंबिवलीत आणून सोडून पलायन केले. दरम्यान, आकाश रात्रभर आरोपींच्या ताब्यात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Read Also : रस्त्याअभावी गर्भवतीचा डोलीतून प्रवास, जुळ्या बाळांचा मृत्यू

याप्रकरणाची अधिकची माहिती अशी की, शनिवारी रात्री आठ ते रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान अपहरणाचा हा प्रकार डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव स्मशानभूमी रस्ता शिवा स्कॅप मार्ट ते नवी मुंबईतील खारघरदरम्यान घडला आहे. आकाश उर्फ शिवा ननकू राम (२४) असे भंगार विक्रेत्याचे नाव आहे. तर जगू दिवाणे, संकेत गायकवाड, वांग्या पवार अशी आरोपी तरुणांची नावे आहेत. 
फियार्दी आकाश राम आणि तिन्ही आरोपी एकाच भागात राहत असल्याने एकमेकांना परिचित आहेत. आकाश भंगार विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे त्याच्याजवळ भरपूर पैसे आहेत, असा आरोपींचा समज होता. आकाशचा वाढदिवस असल्याने आपण त्याच्याचकडून मेजवानीच्या ना‌वाखाली पैसे उकळू, असा कट आरोपी वांग्या, जगू आणि संकेत यांनी आखला. 

Read Also : मुलीच्या जन्माच्या ४ महिन्यांतच पुन्हा आई होणार ही अभिनेत्री

त्याप्रमाणे आरोपींनी आकाशला शनिवारी रात्री आठ वाजता घराबाहेर मोबाइल करुन बोलावून घेतले. मित्र बोलवितात म्हणून तो घराबाहेर आला. आरोपींनी आकाशला आपण तुझ्या वाढदिवसाची मेजवानी साजरी, करू असे सांगू लागले. आकाशने त्यास नकार देऊ लागला. हे बोलणे सुरू असतानाच तिन्ही आरोपींनी आकाशला जबरदस्तीने एका रिक्षामध्ये बसविले. आकाशने त्यास प्रतिकार केला, पण आरोपींनी त्याला घट्ट पकडून ठेवले होते. रिक्षात बसल्यावर आकाशकडील मोबाईल, पाकिटातील पाच हजार रुपये आरोपींनी काढून घेतले.

आकाश आरोपींच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी वांग्याने आकाशला बंदुकीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. आपले अपहरण केले जात आहे, याची जाणीव झाल्यावर आकाश घाबरला. त्याने  आरोपीच्या तावडीतून सुटण्याची धडपड केली परंतु आरोपी त्याला सोडत नव्हते. आरोपींनी रिक्षा सुसाट वेगाने नवी मुंबईतील खारघर भागात नेली. या भागात आकाशला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी, पट्टयाने बेदम मारहाण केली त्यानंतर त्याला सोडून आरोपी पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी