ठाणे : देशभरात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात आहे. दरम्यान, जयंतीच्या पूर्वसंध्येला एक मोठी विरार परिसरात एक मोठी दुदैवी घटना घडली. विरार पूर्वेच्या कारगिल नगरमध्ये गुरुवारी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Two died due to electric shock in Virar)
मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिलला संध्याकाळी विरारच्या मनवेलपाडा ते कारगिल परिसरात रॅली काढण्यात आली होती. ज्यामध्ये अनेक लोक सहभागी झाले होते. कारगिलमधील रॅली संपल्यानंतर लोक आपापल्या घरी परतत होते. त्यामुळे ज्या वाहनावर स्पीकर लावण्यात आले होते ते वाहन अडकले. अशा स्थितीत काही तरुणांनी त्याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांना विजेचा धक्का बसला.
अधिक वाचा : सूर्यदेव तळपला! विदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूरमध्ये जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुण वाहनाला धक्का देत होते. त्यानंतरच त्या वाहनावर झेंडा लावण्यासाठी वापरण्यात येणारा स्टीलचा खांब ट्रान्सफरच्या संपर्कात आला. त्यामुळे सर्वांना विजेचा जोरदार धक्का बसला. जखमीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.