MLA Dhiraj Deshmukh: रायगड: सध्या राजकारणात देखील खो खो, आणि कबड्डीतले डावपेच शिकले पाहिजेत असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी केलं आहे.
सध्या राजकारणात देखील खो खो, आणि कबड्डीतले डावपेच शिकले पाहिजेत. आता या डावपेचांची गरज आहे, असं सांगत सध्या विधीमंडळात देखील अशीच खेळी चालते, कधी कोण कोणाला खो देईल हे सांगता येत नाही, असा टोला धीरज देशमुख यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.
अधिक वाचा- VIRAL VIDEO: तरुणीचा डान्स पाहून आजोबा घायाळ, स्टेजसमोर पोहोचले अन्...
आता आधिवेशनाला बसने आणायचं, सकाळ दुपार संध्याकाळची सोय करायची आणि परत सुखरूप आपल्या मतदार संघात जाईल याची व्यवस्था करायची अशी पद्धत सुरू झाली असल्याची कोपरखळी धीरज देशमुख यांनी रायगडमध्ये बोलताना मारली. ते रोहा येथे आयोजित राज्य अजिंक्य पद आणि निवड चाचणी खो खो स्पर्धेच्या समारोप प्रसंगी बोलत होते.