मुंबई: Mahaparinirvan Din 2022: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din)आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील दादरमधल्या चैत्यभूमी (Chaitybhoomi) इथे जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. या देशाची दशा आणि दिशा बदलण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम वेगानं सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झालं असल्याचंही देवेंद्र फडणवीस कार्यक्रमात म्हणाले.