Indian Cricket : विजयी व्हा! हॅगले ओव्हलवरून आली आनंदाची बातमी, टीम इंडिया पोहोचली WTC फायनल, कशी जाणून घ्या 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Mar 13, 2023 | 16:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

WTC Final : हॅगले ओव्हलवरून भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. अहमदाबाद कसोटीपूर्वी टीम इंडियाकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 3 पर्याय होते.

Be victorious! Good News From Hagley Oval, Team India Reach WTC Finals, Know How
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC फायनल  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी
  • न्यूझीलंडने शेवटच्या षटकात श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC फायनल

WTC Final : हॅगले ओव्हलवरून भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. 

हॅगले ओव्हल येथील कसोटीच्या शेवटच्या दिवशी पाऊस झाल्याने  श्रीलंकेच्या आशा संपुष्टात आल्या. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या निकालाचा डब्ल्यूटीसीमधील टीम इंडियाच्या स्थानावर कोणताही परिणाम होणार नाही. हॅगले ओव्हलवर खेळल्या गेलेल्या  सामन्यात न्यूझीलंडने शेवटच्या षटकात श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडचा विजय होताच टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला. या पराभवासह श्रीलंकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

अधिक वाचा : किंग कोहलीने पुन्हा घेतले करिष्माई 'अंगठी'चे चुंबन, जाणून घ्या यामागचे रहस्य

हर्षा भोगले यांनी आनंद व्यक्त केला

कॉमेंटेटर  हर्षो भोगले यांनी टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचल्याची बातमी शेअर केली. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, दुसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ ते ११ जून दरम्यान खेळवली जाईल. टीम इंडिया डब्ल्यूटीसीच्या पहिल्या फायनलमध्येही खेळली होती, पण त्यावेळी न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

अधिक वाचा : ६ इंचांची ती चाल...,टीम इंडियाची दाणादाण उडवला उस्मान ख्वाजाने रचला इतिहास

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC फायनल

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान ऐतिहासिक ओव्हल मैदानावर खेळवला जाणार असून यावेळी अंतिम फेरीतील दोन स्पर्धक निश्चित झाले आहेत. इंदूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी