मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी आज (21 जुलै) भारतीय क्रिकेट निवड समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने पत्रकार परिषद घेत टीमची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. हा दौरा 3 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-20 मॅचेस, 3 वन-डे मॅचेस आणि दोन टेस्ट मॅचेस खेळणार आहे.
टीम इंडियात शिखर धवनचं पुनरागमन झालं आहे तर हार्दिक पांड्याला आराम देण्यात आला आहे. कॅप्टन विराट कोहली हा संपूर्ण दौऱ्यात असणार आहे. तर महेंद्रसिंह धोनीने यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की तो या दौऱ्यात टीमसोबत नसणार. टी-20 क्रिकेट टीममध्ये राहुल चहल या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
आयसीसी वर्ल्ड कप 2019 संपल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिलाच दौरा आहे. विराट कोहलीच्या नेत्रृत्वात वर्ल्ड कप खेळलेल्या टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियाला न्यूझीलंडच्या टीमने 18 रन्सने पराभूत केलं होतं.
तीन टी-20 मॅचेस
तीन वन-डे मॅचेस
दोन टेस्ट मॅचेस