Third India vs Australia Test moved out of Dharamsala : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच आधी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होती. पण आता ही मॅच धरमशालात होणार नाही. मॅचसाठी इंदूर आणि राजकोटच्या मैदानाबाबत विचार सुरू आहे. लवकरच अंतिम निर्णय जाहीर होईल.
धरमशाला येथील मैदानावर अलिकडेच काही बदल करण्यात आले. या बदलांनंतर इंटरनॅशनल मॅचसाठी धरमशालाचे मैदान तयार होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचा अंदाज आला. हा अंदाज आल्यामुळेच बीसीसीआयने धरमशालातील टेस्ट मॅच दुसऱ्या ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
धरमशाला ऐवजी तिसरी टेस्ट मॅच इंदूर आणि राजकोट यापैकी एका ठिकाणी होईल. अंतिम निर्णय पुढील काही दिवसांत जाहीर केला जाईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 2 टी 20 मॅच झाल्या. या मॅचनंतर धरमशालाच्या मैदानाचे आऊटफिल्ड आणि ड्रेनेज सिस्टिम या ठिकाणी काही बदल करण्याचा निर्णय झाला. हा बदल झाल्यानंतर त्याची तपासणी होऊन नियमानुसार मैदान आंतरराष्ट्रीय मॅचसाठी सज्ज होण्याकरिता जास्त वेळ लागणार आहे. या परिस्थितीचा अंदाज येताच बीसीसीआयने धरमशालातील टेस्ट मॅच दुसऱ्या ठिकाणी खेळवण्याबाबत विचार सुरू केला आहे.
सचिनची मुलगी सारा तेंडुलकर सध्या काय करतेय?
border-gavaskar trophy :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 200 पेक्षा जास्त रन बनवणारे खेळाडू