Gujarat Titans vs Rajasthan Royals, Final : कर्णधार (Captain) हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) अष्टपैलू (all round) कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) यंदाच्या आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. संघाच्या पदार्पणातच दमदार कामगिरी करणाऱ्या गुजरात संघानं अंतिम सामन्यात राजस्थानचा (Rajasthan Royals) सात विकेट्सनी धुव्वा उडवला. हा सामना जिंकल्यानंतर गुजरातच्या संघानं आणि संघाच्या कर्णधारानं अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. स्टेज ग्रुपमध्ये अव्वल असणाऱ्याच संघानेच आयपीएलचं विजेतेपद पटकावल्याचं आयपीएलच्या इतिहासात पाचव्यांदा झाले आहे. गुजरातपूर्वी राजस्थान रॉयल्स (2008) आणि मुंबई इंडियन्स (2017, 2019 आणि 2020) यांनी हा विक्रम केला आहे.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यालाही राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. त्याने या सामन्यात 17 धावांत 3 बळी घेतले. याशिवाय त्याने फलंदाजीत 34 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत सामनावीराचा किताब पटकावणारा तो तिसरा कर्णधार ठरला. त्यापूर्वी अनिल कुंबळे आणि रोहित शर्मा यांनीही हा पराक्रम केला आहे.
गुजरात संघानं अंतिम सामन्यात राजस्थानचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात राजस्थाननं गुजरातसमोर अवघ्या 131 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. गुजरातच्या प्रभावी आक्रमणासमोर राजस्थानला 20 षटकात 9 बाद 130 धावांचीच मजल मारता आली. जॉस बटलरनं सर्वाधिक 39 धावांचं योगदान दिलं. गुजरातकडून हार्दिक पंड्यानं अवघ्या 17 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
गुजरातच्या संघाने दमदार फलंदाजी करत विजय मिळवला. हार्दिक पंड्या आणि सलामीच्या शुभमन गिलनं तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांची निर्णायक भागीदारी रचून गुजरातला विजयपथावर नेलं. हार्दिकनं 34 तर शुभमननं नाबाद 45 धावा केल्या. त्याआधी तर साई किशोरनं दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमी, यश दयाळ आणि रशिद खाननं प्रत्येकी एक विकेट घेतली.