May 24, 2023
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच अनेक गंभीर आजारांवरही प्रभावी आहे.
Credit: pexels
तुळशीच्या पानांत रोझमॅरिनिक अॅसिड, एपिगेनिन, ल्यूटोलिन यासारखे फायटोकेमिकल्स असतात. यामुळे शरीराचे अनेक प्रकारच्या कर्गरोगापासून संरक्षण होते.
Credit: istock
मधुमेहविरोधी गुणधर्मांमुळे दररोज सकाळी तुळशीच्या पाने मिसळलेले पाणी प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
2 ग्रॅम तुळशीच्या बिया एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच या पानांच्या सेवनाने अपचनासारखी समस्या दूर होते.
तुळशीच्या पानांत हायपो प्रोटेक्टिव गुण असतात. यामुळे तुळशीची पाने खाल्ल्याने यकृत निरोगी राहण्यास मदत होते.
दररोज तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात.
जर दररोज तुळशीची पाने खाल्ली तर तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांच्या संबंधितील समस्यांपासून आराम मिळतो.
तुळशीची पाने खाल्ल्याने तुमची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. परिणामी तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ तुळशीत आढळतो. यामुळे तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांच्या संबंधित आजार दूर होण्यास मदत होते.
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद