Feb 28, 2023
BY: Times Now Digitalलग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल खूप विचार केला जातो आणि नववधू-वर यांची यावरुन चेष्टा मस्करी केली जाते. पण प्रत्यक्षात लग्नाच्या पहिल्या रात्रीत नेमकं काय करतात? जाणून घ्या...
Credit: pexels
2013 च्या सर्वेक्षणात असे समोर आले की, बहुतेक भारतीय अरेंज मॅरेजलाच प्राधान्य देतात. 2013 मध्ये अशा नागरिकांची संख्या 75 टक्के इतकी होती. लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्सबद्दल वेगवेगळे समज आहेत. अनेकांना वाटते की त्यावेळी खूप दबाव असतो.
Credit: pexels
सर्वेक्षणानुसार, 16 टक्के नागरिक लग्नानंतर पहिल्या रात्री इंटिमेट झाल्यावर निराश होतात तर 9 टक्के लोक लग्नानंतर किमान दोन दिवस वाट पाहतात आणि त्यानंतर शारीरिक संबंध ठेवतात.
Credit: pexels
लग्नाच्यावेळी अनेक विधी, परंपरा असतात आणि त्यामुळे नवविवाहित थकतात. अशा स्थितीत त्यांना झोपेची गरज असते. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री बहुतेक जोडपे एकमेकांसोबत थोडे बोलतात आणि झोपून जातात.
Credit: pexels
सध्याच्या काळात लग्नानंतर लगेचच हनिमूनला जाण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या रात्री यापैकी बहुतेकजण हे हनिमूनचे नियोजन करतात.
Credit: pexels
लग्नानंतर पहिल्या रात्री नवविवाहित जोडपे एकमेकांसोबत गप्पा मारतात. विविध मुद्द्यांवर ते चर्चा करु लागतात.
Credit: pexels
बहुतेक जोडपे हे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अरेंज मॅरेजनंतर पहिले काही दिवस एकमेकांना समजून घेतात. आपले कुटुंब, नातेवाईक, जुन्या आठवणी याबाबत चर्चा होतात.
Credit: pexels
अनेक कुटुंबात पहिल्या रात्री विविध गेम्स खेळतात. त्यामुळे पहिल्या रात्री पती-पत्नीला एकमेकांसोबत जास्त वेळ घालवण्यास मिळत नाही.
Credit: pexels
ही स्टोरी पाहिल्याबद्दल धन्यवाद